नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. या दुःखद घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या असून अजितदादांच्या कार्याचा गौरव केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शोकसंदेश:
“श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.”
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात अजित पवारांच्या प्रशासकीय पकडीचे विशेष कौतुक केले आहे. एक कार्यक्षम प्रशासक आणि सामान्यांसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीतही तितकीच आदरणीय होती, हे पंतप्रधानांच्या शब्दांतून स्पष्ट झाले.
पंतप्रधानांशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. केंद्र सरकार या कठीण काळात महाराष्ट्र सरकार आणि पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.