Friday, February 20, 2026

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!

Share

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवृत्त होणारे दिग्गज खासदार
या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील ७ जागा रिक्त होत आहेत. यामध्ये खालील नेत्यांचा समावेश आहे:

भाजप: डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले (भाजप कोटा).

राष्ट्रवादी (शरद पवार गट): शरद पवार आणि फौजिया खान.

शिवसेना (ठाकरे गट): प्रियांका चतुर्वेदी.

काँग्रेस: रजनी पाटील.

मतांचे गणित आणि विजयाचे समीकरण
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी एका उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची आवश्यकता आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार चित्र स्पष्ट दिसत आहे:

महायुती (भाजप + शिंदे + अजित पवार): संख्याबळानुसार महायुतीचे सहज ६ उमेदवार निवडून येऊ शकतात. यामध्ये भाजपचे ४, शिंदे गटाचा १ आणि अजित पवार गटाचा १ उमेदवार असू शकतो.

महाविकास आघाडी (ठाकरे + काँग्रेस + शरद पवार): मविआकडे केवळ १ जागा निवडून आणण्याइतपत मते आहेत. मात्र, यासाठी तिन्ही पक्षांची एकजूट असणे अनिवार्य आहे.

भाजपचे ‘धक्कातंत्र’ आणि संभाव्य उमेदवार
भाजप नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. सध्या विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे आणि सुनील देवधर यांची नावे चर्चेत आहेत. तसेच, रामदास आठवले यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे किंवा संजय निरुपम, तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल:

पक्षआमदार संख्या
भाजप१३१
शिवसेना (शिंदे)५७
राष्ट्रवादी (अजित पवार)४०
शिवसेना (ठाकरे)२०
काँग्रेस१६
राष्ट्रवादी (शरद पवार)१०
अपक्ष व इतर१२

अन्य लेख

संबंधित लेख