Sunday, October 20, 2024

तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे… माजी खासदार पुनम महाजन

Share

भारताला जागतिक महासत्ता झालेले पहायचे असेल तर तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त नव्या विकसित भारताच्या दिशेने तरुणांनी देशाला पुढे नेले पाहिजे. असे प्रतिपादन माजी खासदार पुनम महाजन यांनी नुकतेच जळगावं येथे केले. डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालयाच्या वतीने “भारत महासत्ता निर्मितीत आपला सहभाग” या युवकांसाठीच्या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे सर्वेसर्वा माजी खासदार डॉ उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकीताई पाटील यावेळी उपस्थित होत्या.

पुनमताईंनी यावेळी मार्गदर्शन केले…
युवकांच्या स्वप्नांना योग्य प्रारंभ देण्यासाठी भारत सरकार नेहमी प्रयत्नशील आहे. २०४७ मध्ये भारत महासत्ता झाल्यानंतर भारतात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे लढले आणि झटले त्याचे फळ आपल्याला २०४७ च्या रुपांत मिळणार आहे.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची शपथ घेताना हे सरकार युवक आणि महिलांच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले होते. असेही त्या म्हणाल्या. तुम्ही ध्येय ठरवले तर मार्ग नक्कीच दिसतात. युवकांच्या स्वप्नांना योग्य प्रारंभ देण्यासाठी भारत सरकार नेहमी तयार आहे. काळानुरुप बदल स्विकारले पाहिजे. “खाली हात आये थे लेकीन खाली हात नही जायेंगे, कुछ करके जाऐंगे…तुमचे स्वप्न आयुष्याचा ठरलेला गोल आहे. मी आणि आपण मिळून भारताला महासत्ता बनवू यासाठी स्वप्न देशाच्या स्वप्नाशी जोडा. असे आवाहनही पुनम महाजन यांनी केले. यही समय है, सही समय है…आपण सर्व मिळून राम करुया, मुलींनी सर्वांना पुरुन उरेल अशी कामगिरी सतत करत आहेत, भविष्यातही आपल्या वीर मुली काम करत राहतील. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

२०१४ मध्ये मी ज्या मतदारसंघात लढले तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आपण आव्हान स्विकारले आणि निवडणूक जिंकले. वेड लागले की इतिहास घडतो. हुशार लोक तुमचा इतिहास वाचतात. २००१ मध्ये भारताने महासत्ता होण्याकडे पहिला पाया रचला. पोखरणची चाचणी झाली. भारत आणि चीन हे दोन देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहेत. मात्र दोघांमध्ये फरक आहे, भारतात लोकशाही आहे तर चीनमध्ये लोकशाही नाही. आपली संस्कृती आणि विश्वासार्हता यामुळे जगभरात भारताबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. याची अनेक उदाहरणे आहेत, जसे रशिया आणि युक्रेन संघर्षादरम्यान भारत मध्यस्थी करेल असे कोणालाही वाटले न्हवते. कोविड काळांत भारतात निर्मित लस अनेक देशांना पुरवण्यात आली आणि ती सर्वोत्तम ठरली. अशा विकसित राष्ट्रउभारणीच्या कामांत आपण सर्वजण सहभागी होऊ आणि सगळे मिळून भारताला पुढे नेऊ अशी खात्री पुनमताईंनी दिली.

त्यांच्या संबोधनानंतर पुनमताईंनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. समारोपाचे भाषण डॉ उल्हास पाटील यांनी दिले तर प्रास्ताविक वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ प्रशांत साळुंके यांनी केले. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

अन्य लेख

संबंधित लेख