मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह राज्याच्या इतर बाबींच्या संदर्भात महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे राज्यातील राजकीय मंडळींमध्ये धुसफूस वाढलीआहे.
शरद पवार महाविकास आघाडीचे असूनही राज्याच्या राजकारणात सक्रिय भूमिका अधोरेखित करत महायुती सरकारशी सलगी करत आहेत. राज्यातील चर्चेचा विषय असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या चर्चेचा भर असल्याचे मानले जात आहे. शरद पावर यांनी २२ जुलै रोजी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती.
दरम्यान, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने चाळींच्या पुनर्विकासाबाबत चर्चा केली, हा महत्त्वाचा सार्वजनिक हिताचा मुद्दा आहे. तसेच, उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी पण यावेळी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे मनसे प्रमुखांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची धोरणात्मक वाटचाल म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. या चर्चेचा महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
- सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन
- देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे
- नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन
- राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान
- “भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर टिप्पणी करण्याआधी अमेरिकेने स्वतःचा इतिहास पाहावा”