राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) एक निवेदन जारी करून बांगलादेशमध्ये (Bangladesh) गेल्या काही दिवसांत सत्ता परिवर्तनाच्या आंदोलनादरम्यान हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संसंघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी हे वक्तव्य केले आहे.
दत्तात्रेय होसाबळे म्हणाले कि, हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या महिलांवरील लक्ष्यित हत्या, लूटमार, जाळपोळ आणि जघन्य गुन्हे आणि बांगलादेशातील हिंदू मंदिरांवरील हल्ले अश्या प्रकारची क्रूरता असह्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचा तीव्र शबदात निषेध केला आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अशा घटना ताबडतोब थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, सरकारने पीडितांच्या जीविताचे, मालमत्तेचे आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. आम्ही जागतिक समुदायाला आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की, या कठीण काळात हिंदू, बौद्ध इत्यादी छळ झालेल्या समुदायांसोबत एकजुटीने उभे राहावे.
बांगलादेशच्या परिस्थितीत शेजारी मित्र देश म्हणून योग्य भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारत सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंदू, बौद्ध इत्यादी लोकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.
- रुग्णांसाठी दिलासा! फडणवीस सरकार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष” सुरू करणार
- प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर बीडच्या दामिनी देशमुख करणार राष्ट्रध्वजावर पुष्पवृष्टी
- मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये ऐतिहासिक ५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार – उदय सामंत
- दावोसमध्ये महाराष्ट्राचा दबदबा, भविष्यात महाराष्ट्र बनेल डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- दावोस फोरममध्ये इतिहास घडला! ५४ सामंजस्य करार, १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगार निर्मिती!