Friday, October 18, 2024

हिंदूंनी १०० टक्के मतदान करणे महत्त्वाचे का आहे?

Share

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि आताच आलेला हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल हिंदू समाजासाठी एक मोठा धडा आहे. लोकसभा निकालाने हिंदू समाजाला लवकरच जागृत होऊन एकत्र येण्यासाठी एक प्रकारे ईश्वरीय इशारा दिला आहे. हिंदूंनी एकत्रित होऊन १०० टक्के मतदान नाही केले तर काही घराणेशाही जोपसणारे राजकीय पक्ष, स्वार्थी बुद्धिजीवी, जागतिक मार्केट फोर्सेस आपल्यावर शरिया आणि वामपंथी संस्कृती लादून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला नाकारतील व पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान सारखी आपली सामाजिक, आर्थिक आणि अध्यात्मिक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. लोकसभा निवडणुकीपासून आपण बघतोय कशा प्रकारे खोटे विमर्श रेटून समाजात पसरवले जात आहेत. त्यातले दोन खोटे विमर्श ज्यामुळे हिंदू समाजात फूट पडली ती म्हणजे भाजप सरकार पुन्हा निवडून आलं तर संविधान बदलण्यात येईल व आरक्षण संपुष्टात येईल, या खोट्या विमर्षांचा काही प्रमाणात भाजपाला फटका बसला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जेंव्हा लोकांना सत्यता कळाली की संविधान बदलता येत नाही आणि आरक्षणही जाणार नाही तेव्हा पुन्हा त्यांनी हरियाणात भाजपाला तिसऱ्यांदा जिंकून दिले. आता संविधानाचा विमर्श फेल जातोय हे बघून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत एक नवीन खोटा विमर्श पसरवण्यात येत आहे तो म्हणजे “पुन्हा महायुती सरकार निवडून आले तर महाराष्ट्राला गुजरातच्या वेठीस बांधले जाईल” पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जरी गुजरात राज्याशी संबंधित असले तरी ते ज्या विचारधारा व संघटनेतून घडून आज या पदावर कार्य करित आहेत तिथे जातीवाद, प्रांतवाद आणि भाषावाद या कुजलेल्या विचारांना मान्यता नाही, त्यांची घडण फक्त “राष्ट्र प्रथम” या भावनेने व विचारांनी झाली आहे. त्यामुळे असं घाणेरडे राजकारण त्यांनी मागच्या दहा वर्षात कधीही खेळलं नाही आणि पुढे कधीही खेळणार नाही. जो खोटा विमर्श या संबंधित फैलवला जात आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला पळवून नेल्या जात आहेत, हे जर खरं असतं तर मग महाराष्ट्र आर्थिक गुंतवणूकीत नंबर एक कसा राहिला असता तोही मोठ्या फरकाने? ही सर्व खोटी विमर्श लोकांना भ्रमित करून सत्तेवर येण्यासाठी आहेत. या सर्व विमर्षांना बळी न पडता आपण एकजूट होऊन १०० टक्के मतदान केले पाहिजे. एक विचित्र प्रकारची मानसिकता आपल्याला या निवडणुकींमध्ये बघायला मिळाली. ती म्हणजे मुस्लिम समाजाला त्यांचा विकास घडवून आणणाऱ्या सरकारशी काही घेणे देणे नाही, त्यांच्यासाठी फक्त मजहब महत्वाचा आहे, असावा त्यात काही वाईट नाही परंतु जे सरकार “सबका साथ, सबका विकास” या धोरणाच्या अनुषंगाने मागच्या दहा वर्षापासून काम करत आहे, ज्या योजनांचा मुस्लिम समाजाने ही मोठ्या प्रमाणात फायदा घेतला व अजूनही घेत आहेत परंतु मतदान करताना फक्त मजहब आणि शरिया यावर त्यांना ज्या विरोधकांवर विश्वास आहे अशा उमेदवारांना एकगठ्ठा मते देण्यात आली, जिथे हिंदू बहुसंख्येने आहे पण मतदानाच्या दिवशी बाहेरच पडला नाही किंवा कुटुंबासोबत पिकनिकला निघून गेला तिथे मुस्लिम मताधिक्यामुळे त्यांना जो उमेदवार हवा होता तो त्यांनी निवडून आणला, तो उमेदवार योग्य होता की नाही हा भाग वेगळा. हिंदूंना असं वाटत असतं की मतदान न केल्याने काही फरक पडत नाही (माझ्या एका मताने काय फरक पडेल) असा अनेकांचा समज असतो.  त्यामुळे शहरे आणि महानगरांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी दिसते.  सामाजिक, आर्थिक आणि अध्यात्मिक विकासाच्या सर्व पैलूंमध्ये राज्याला आणि भारताला एक महान राष्ट्र म्हणून पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला व्यापक दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे.  प्रत्येक मत राज्याला व देशाला बळकट करण्यासाठी आणि अंतर्गत आणि बाह्य शत्रूंशी लढण्यासाठी मदत करते.  आपण आपल्या महान राज्यात आणि राष्ट्रात अनेक त्रासदी पाहिल्या आहेत आणि कोणालाच नको असलेल्या मानसिकतेला आपण बळी पडलो आहोत.  गेल्या काही दशकांत विकसित झालेल्या “औपनिवेशिक मानसिकतेचा” घराणेशाही राजकीय पक्षांना व्यक्तिगत स्वार्थासाठी फायदा झाला आहे, त्यामुळे अशी मदत करणारी मानसिकता त्यांना कधीही बदलायची नाही.  जर आपल्याला आपल्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूंमध्ये खरोखर भीती निर्माण करायची असेल तर आपण मतदान केलेच पाहिजे. हिंदूंना मतदानाच आवाहन म्हणजे दुसऱ्या रिलीजनचा द्वेष नव्हे परंतु जेंव्हा जेंव्हा हिंदू समाज एकत्र येऊन कार्य करतो तेव्हा तो सर्वांच्या भल्यासाठी व राष्ट्र प्रथम भावनेने कार्य करतो. 

जेव्हा जेव्हा देशभक्त ईव्हीएम बटण दाबतो तेव्हा तो अंतर्गत आणि बाह्य शत्रूच्या मनात शॉकवेव निर्माण करतो. काहीजण असा तर्क करू शकतात की दहा वर्षांनंतरही अजूनही बरीच आव्हाने आहेत.  होय, प्रत्येकजण सहमत असेल, परंतु आपण आपल्या जीवनातील व्यक्तिगत अनुभवांचा अभ्यास केला पाहिजे.  आज आपण जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांच्या आणि घराण्याच्या अनेक पिढ्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे.  त्याचप्रमाणे, या विशाल देशात २४ कोटींहून अधिक कुटुंबे आहेत व महाराष्ट्रात जवळपास ३ करोड कुटुंब आहेत, ज्यात विविध संस्कृती, राजकीय विचारसरणी आणि सर्व स्तरांवर विविध प्रकारचे प्रशासन आणि शासन कार्यरत असते. त्यामुळे, जरी आपण जमिनीवर भरपूर विकासाचे पुरावे पाहू शकतो, परंतु महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी आणखी काही वर्ष लागतील. महाराष्ट्र धर्म, अस्मिता, राज्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास, संस्कृती रक्षण, अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे ,आर्थिक चक्रात सकारात्मक बदल, स्वावलंबी भारताचा एक भाग म्हणून विविध “स्व” आधारित धोरणे आणि अंमलबजावणी, “स्व” च्या दिशेने प्रगती करत वसाहतवादी मानसिकता काढून टाकणे. महाराष्ट्र धर्म व देश प्रथम विचारसरणीचा विकास आणि राष्ट्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी सनातन धर्माचे महत्त्व ओळखून अशा सरकारला निवडून परत आणावे लागेल. राष्ट्र आणि राज्य विध्वंसक मानसिकतेतून विधायक मानसिकतेकडे वळले आहे आणि जर आपण ही मानसिकता तयार करत राहिलो तर एक-दोन दशकात आपण निःसंशयपणे “विश्वगुरू” होऊ.  आणि तसे होण्यासाठी, आपण निवडणुकीच्या दिवशी मतदान केले पाहिजे आणि इतरांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.  लक्षात ठेवा, आम्ही मूलभूतपणे प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक जीवनातील सर्व घटकांमध्ये प्रगती करण्यास मदत करण्याचा मार्ग निवडला आहे. म्हणून जिंकण्याबद्दल आश्वस्त आहोत किंवा बेजबाबदार वृत्ती बाळगून मतदान केले नाही, तर केवळ आपल्या कुटुंबासाठी किंवा पक्षासाठी काम करणारा उमेदवार आपल्याला सर्व आघाड्यांवर, अगदी अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीतही सर्वांना अडचणीत आणेल.  

काही लोक असा युक्तिवाद करतात की सर्व पक्ष समान आहेत आणि ते नैतिकतेने कार्य करत नाहीत.  होय, आपण सर्व काही प्रमाणात सहमत असू, परंतु जेव्हा आपण हजारो वर्षे मागे वळून पाहतो आणि जगभरातील इतर देशांशी तुलना करतो तेव्हा आपल्याला दिसून येते की जी परिस्थिती पूर्वी होती ती काही प्रमाणात आज ही आहे. या सर्व परिस्थितीवून सुद्धा आपल्याकडे “सर्वोत्तम उपलब्ध” निवडण्याचा पर्याय आहे ज्यांच्याकडे “महाराष्ट्र धर्म व राष्ट्र प्रथम” अजेंडा आहे, संविधानाविरुद्ध तयार केलेले वक्फ बोर्ड ऍक्ट घालवणे किंवा मोठा बदल करणे, समान नागरिक संहिता कायदा संविधानानुसार अमलात आणणे, सर्वांचा सामाजिक आणि आर्थिक विकास, रोजगार वाढवण्यासाठी योजना व कार्य, अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी कार्य करणारं सरकार, शेवटच्या वंचित माणसाच्या विकासासाठी कार्य करणारं, संस्कृती आणि धर्म पुनर्संचयित करण्यासाठी कार्य करणारं, आणि “स्व” आधारित मानसिकता विकसित करण्यासाठी कार्य करतात असं सरकार आपल्याला निवडायचं आहे.

वक्फ बोर्ड
वक्फ बोर्ड हिंदू समाजासाठी किती खतरनाक आहे हे समजून घेऊन तरी मतदानाला बाहेर पडा. जे वक्फ बोर्डच समर्थन करतील अशा सर्वांना हरवायला नको का? आतापर्यंत जेवढी जमीन, प्रॉपर्टी वक्फ बोर्डाने हिंदूंकडून (यात बौद्ध, जैन आणि सिख ही आले ) हिसकावून घेतली आहे आणि हा धोका भविष्यात सर्वांसाठीच आहे हे प्राथमिकरित्या लक्षात घेतलं पाहिजे. असा कायदा जगात कुठे ही नाही. वोट बँकचे लांगुल चालन करणाऱ्या पक्षांच्या उमेदवारांना आपण हिंदू म्हणून एकत्र येऊन हरवायला नको का? 

 आपण मतदान का केले पाहिजे आणि इतरांना मतदान करण्यास का प्रोत्साहित केले पाहिजे: 

१. २०२८ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठले जाईल.
२. उद्योजकता आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी “स्व” आधारित अर्थव्यवस्थेला चालना दिली जाईल.
३. वक्फ बोर्ड संबंधित विधेयकाला पारित करण्यासाठी केंद्र सरकारला समर्थन.
४. शेतकरी व ग्रामीण विकासावर भर 
५. महिला सशक्तीकरण व महिलांच्या सुरक्षिततेत वाढ
६. पर्यावरणास जबाबदार आणि शाश्वत विकासाचे नियोजन आणि अंमलबजावणी
७. आपल्या राज्याच्या सामाजिक-आर्थिक जडणघडणीला धोका निर्माण करणाऱ्या नक्षलवाद आणि विदेशी दलालांचा मुकाबला आणि पराभव करणे.
८. निव्वळ निर्यात साध्य करणे.
९. भारताच्या सार्वभौमत्वाला घातक असलेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले नसून काही राजकीय नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी लागू केलेले कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारला मदत.
१०. मुख्य घटक म्हणून अर्धसंवाहक (Semiconductor) असलेले इलेक्ट्रॉनिक हब विकसित करणे.
११. गढ व किल्ले संवर्धन 
१२. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी आणि कार्यक्षम अंमलबजावणी
१३. स्टार्ट-अप, पेटंट आणि युनिकॉर्नमध्ये जलद वाढ.
१४. गरिबी दरात लक्षणीय घट
१५. व्यवसाय करण्याची सुलभता वाढेल
१६. लाडकी बहीण योजना व अशा सहाय्यक योजना चालू ठेवण्यासाठी 
१७. ड्रग माफिया आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचे स्त्रोत नष्ट केले जातील.
१८. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
१९. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अधिक शेतकरी-अनुकूल धोरणे.
२०. संशोधन आणि नवकल्पना यांना प्राधान्य दिले जाईल.
२१. आंतरराष्ट्रीय मंचांवर आपल्या सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी.
२२. महान स्वातंत्र्यसैनिक आणि ऐतिहासिक व्यक्तींना पुरस्कृत केले जाईल.
२३. सर्व क्षेत्रांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जाईल.
२४. एक देश, एक निवडणूक समर्थन 
२५. घराणेशाहीचे राजकारण कमकुवत होईल

ही काही क्षेत्रे आहेत जिथे प्रगतीची अपेक्षा करू शकतो जर आपण मतदान केले आणि इतरांना मतदान करण्यास उद्युक्त केले तरच. आता आपण आपले विचार शिथिल करू शकत नाही;  अन्यथा, २०१४ पूर्वी आपण ज्या निराशाजनक कालावधीचा सामना केला होता, त्याचप्रमाणे आपल्याला आणखी एका निराशाजनक कालावधीला सामोरे जावे लागेल. वक्फ बोर्ड, भावी पिढ्यांच्या, आपल्या मुलांची आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा विषय डोक्यात ठेवा,  मतदानाच्या बाबतीत नकारात्मक दृष्टीकोन आणि आळशीपणा विकसित केल्यास प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीवर कसा विपरीत परिणाम होईल याचा विचार करा.  प्रत्येकाने स्वतःला आणि इतरांना योग्य मार्गावर नेण्यासाठी मतदान करण्याची प्रेरणा देणारी ठिणगी बनावी. आपण कुठल्याही रिलीजनच्या विरोधात नाही आहोत पण सर्व समाज आणि देशाचं भलं करण्यासाठी हिंदूंना एकत्र येणं नितांत आवश्यक आहे.

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम !

 पंकज जगन्नाथ जयस्वाल 

अन्य लेख

संबंधित लेख