पुणे : विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर त्यांना केवळ वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकानावर केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना काँगेसवर हल्लाबोल केला. वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मनमानीला चाप लावण्यासाठी गुरूवारी संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. मात्र, विरोधकांकडून या विधेयकाला विरोध करण्यात येत आहे.
“मागच्या काळात महाराष्ट्रात वक्फचा घोटाळा झाला. यावेळी वक्फच्या जमिनी कोणी लाटल्या, त्यात काँग्रेसचे कोणते नेते होते, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्याचा अहवालही समोर आला आहे. विरोधकांना वक्फशी काहीही देणंघेणं नाही. तर त्यांना त्या जमिनीशी देणंघेणं आहे. त्या जमिनी कशा लाटता येतील हा त्यांचा प्रयत्न आहे,” असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
“या विधेयकामुळे पारदर्शकता येणार होती. त्यामुळे जमिनी लाटणाऱ्यांना याची अडचण होणार होती. वक्फचा कारभार असाच सुरु राहावा जेणेकरून त्यांना जमिनी लाटता येईल, असं विरोधकांना वाटतं. त्यामुळे त्यांनी त्याचा विरोध केला. पण हे विधेयक समितीकडे आहे आणि त्यावर योग्य निर्णय होईल,” असेही ते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- ‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित!
- ‘मार्ग वेगळे, पण दिशा एकच!’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ विचारात अंतर नाही
- रोहित, विराट, यशस्वीचा ‘विराट’ शो! टीम इंडियाचा तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सने दणदणीत विजय; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत मालिका खिशात!
- ‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’!
- मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष