Saturday, July 27, 2024

धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला हक्काचे घर देण्याचा प्रयत्न 

Share

CM Eknath Shinde : “राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मागील दहा वर्षात मतदारसंघातील एसआरएचे प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. मुंबईतील रखडलेले प्रकल्प एमएमआरडीए, म्हाडा, एमएसआरडीसी, एमआयडीसी या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील. धारावी पुनर्विकासाच्या (Dharavi Redevelopment) माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला त्याचे हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना, “निवडणूक जवळ आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून २५ वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले असा सवाल यासमयी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. जोवर आकाशात चंद्र सूर्य आहेत तोवर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, “आपल्या सरकारने दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे सुशोभिकरण होते आहे, आपला दवाखाना सुरु आहे, जागतिक दर्जाचे शहर करण्याचा प्रयत्न आपला आहे. कोळीवाड्याचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईकर जो बाहेर फेकला आहे, त्याला परत मुंबईत आणण्याचे काम आपले सरकार करत आहे”, असल्याचं ते म्हणाले.

“२०१४ पूर्वी या शहरातही वारंवार बॉम्बस्फोट व्हायचे. मात्र त्यानंतर एकदाही बॉम्बस्फोट झाला नाही. कारण या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांचे मजबूत नेतृत्व लाभले आहे. मजबूत सरकारसाठी येत्या २० मेला धनुष्यबाणातून असा मतांचा  वर्षाव करा, की मशाल विझली पाहिजे आणि धनुष्यबाण व राहूल शेवाळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले पाहिजेत”, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

अन्य लेख

संबंधित लेख