पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ही यात्रा केवळ भक्तीची अभिव्यक्ती नसून, तिच्या मुळाशी सामाजिक एकात्मता, अध्यात्मिक उन्नती आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे बळ आहे. या यात्रेची परंपरा संतांनी घडवली. हेच इस्लामी आक्रमणांना दिलेले शांत, पण ठाम उत्तर देखील दिले आहे.
औरंगजेब आणि अफझलखान यांसारख्या आक्रमकांनी वारीच्या केंद्रस्थानी असलेल्या पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या मंदिरावर केलेले हल्ले हा त्याच इतिहासाचा एक गंभीर आणि महत्त्वाचा प्रसंग आहे. मुघल बादशाह औरंगजेब याने ‘हिंदू धर्मस्थळांवर आक्रमण करण्याच्या जिहादी वृत्तीला’ त्याच्या राज्यनीतीचा एक भागच बनवला होता. ‘मोगल दरबारची बातमीपत्रे’ या सेतुमाधव पगडी यांनी मराठीत अनुवाद केलेल्या दस्तऐवजात औरंगजेबाच्या १७०५ सालच्या पंढरपूर भेटीचा उल्लेख आहे. या नोंदीनुसार, रमजान महिन्यात औरंगजेबाने आपल्या अधिकाऱ्यांना पंढरपूरचे प्रसिद्ध विठ्ठल मंदिर पाडण्याचे, व त्यामध्ये गायींची कत्तल करण्याचे आदेश दिले होते. त्याचा उद्दिष्ट स्पष्ट होता हिंदूंच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू उद्ध्वस्त करणे हाच. फक्त मंदिर तोडणे नव्हे, तर त्यात गायींची कत्तल करवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणे हे देखील होते. ही घटना केवळ एक धार्मिक छळ नसून, ती धार्मिक सत्तेच्या माध्यमातून संपूर्ण समाजावर मानसिक व सांस्कृतिक आक्रमण करण्याचा प्रयत्न होता.
याचप्रमाणे, १६५९ साली आदिलशाही सरदार अफझल खानानेही पंढरपूरवर आक्रमण केले होते. वाईला जात असताना त्याने पंढरपूरातील विठ्ठल मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. ‘सभासद बखर’ आणि ‘शिवदिग्विजय’ यांसारख्या प्राथमिक ऐतिहासिक ग्रंथांत या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे. अफझल खानाने फक्त मंदिरांवर हल्लेच केले नाहीत, तर हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांना नष्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांची धार्मिक भावनाही दुखावण्याचा प्रयत्न केला होता. या धार्मिक आक्रमणांचा उद्देश फक्त राजकीय वर्चस्व गाजवणे नव्हता, तर हिंदू समाजाच्या मनातील स्वत: विषयीचा आत्मविश्वास गमावणे आणि त्यांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनवणे होता. या पंथनाशक प्रयत्नांविरोधात संत परंपरा ठामपणे उभी राहिली.
तुकोबाराया, नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वर या संतांनी केवळ आध्यात्मिक विचार दिले नाहीत, तर समाजातील तळागाळातील लोकांना आत्मसन्मानाची भावना दिली. पंढरपूरच्या यात्रेला त्यांनी फक्त भक्तिभावाचे स्वरूप दिले नाही, तर तिला सामाजिक संघटनाचे माध्यम बनवले. लाखोंच्या संख्येने भक्त एकत्र आले की, ती शक्ती होते अशी ही संतांची दूरदृष्टी होती. त्यामुळेच ही वारी केवळ धार्मिक उत्सव न राहता, एक प्रकारचे इस्लाम विरोधी सामाजिक प्रतिकाराचे प्रतीक बनली.
पंढरपूरची यात्रा पुढे वार्षिक परंपरा म्हणून रुजली. अफझलखान आणि औरंगजेब यांसारख्या आक्रमकांच्या पाशवी कृत्यांना संतांनी अहिंसक, पण प्रभावी उत्तर दिले. त्यांनी समाजाला एकत्र आणले, त्यात बंधुभाव निर्माण केला आणि भक्तीच्या मार्गाने राष्ट्रभक्तीची शिकवण दिली. यामुळे ही वारी म्हणजे एक सांस्कृतिक जिवंतता बनली. विशेष म्हणजे, ही यात्रा आजही तितक्याच श्रद्धेने, उत्साहाने आणि अस्मितेने पार पडते.
पंढरपूरची ही वारी म्हणजे केवळ दिंड्या किंवा चालत जाणारे वारकरी नाही, तर संत मार्गाचा राष्ट्रनिर्माणाचा प्रवास आहे. वारी आंधळ्या श्रद्धेची परंपरा नाही, तर ती इस्लामी आक्रमणांना दिलेले सुसंस्कृत, अध्यात्मिक आणि लोकशाही पद्धतीचे उत्तर आहे. त्यामुळे आजही जेव्हा वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करतात, तेव्हा ते फक्त विठोबा भेटीला जात नाहीत, तर त्या संत परंपरेच्या आदर्शांना, त्या राष्ट्रभावनेला आणि त्या सांस्कृतिक चेतनेला अभिवादन करत असतात.