
२३ ऑगस्ट रोजी जयपूर येथे झालेल्या भव्य अंतिम सोहळ्यात ५२ स्पर्धकांमधून विजेती ठरत काझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’चा किताब पटकावला आहे. या राष्ट्रीय किताबासह, काझिया आता नोव्हेंबरमध्ये पोर्तो रिको येथे होणाऱ्या ७५ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ काझिया लिझ मेजो कोण आहे?
केरळच्या काझिया लिझ मेजोने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. तामिळनाडूच्या वैष्णवी गणेशने ‘फर्स्ट रनर-अप’ आणि ‘मिस इंटरनॅशनल इंडिया २०२६’चा किताब पटकावला. गुजरातची अनुश्री सातावळेकर ‘सेकंड रनर-अप’ ठरली.
केझिया लिझ मेजो ही केरळमधून ‘मिस युनिव्हर्स इंडिया’चा किताब जिंकणारी पहिलीच स्पर्धक ठरली आहे; ही घटना राज्यासाठी एक ऐतिहासिक मैलाचा दगड आणि भारतीय सौंदर्य स्पर्धांच्या इतिहासातील एका नवीन पर्वाची सुरुवात ठरली आहे.
‘मिस इंडिया इंटरनॅशनल २०२५’ रूश सिंधू म्हणते, “मला खूप जुन्या आठवणी दाटून येत आहेत, कारण ‘मिस युनिव्हर्स इंडिया’च्या मंचावर पाऊल ठेवून आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. याच ठिकाणी मला ‘मिस इंटरनॅशनल इंडिया २०२५’चा मुकुट बहाल करण्यात आला होता आणि यावर्षी आम्हाला भारतात पहिल्यांदाच ‘मिस इंटरनॅशनल’ची प्राथमिक फेरी (प्रिलिमिनरी स्पर्धा) आयोजित करण्याची संधी मिळाली. स्पर्धक आपापल्या या प्रवासासाठी आणि करिअरसाठी सर्वोत्तम स्थान व किताब मिळवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत आहेत… या मंचाने मला अनेक संधी दिल्या आहेत, त्यामुळे मी अत्यंत कृतज्ञ आहे; पण त्याच वेळी, माझ्या आयुष्यातील पुढील टप्पा सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुकही आहे…”
महाराष्ट्राची सौंदर्यवती तिसरी रनरअप ठरली तेजस्विनी श्रीवास्तव
‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ च्या अंतिम स्पर्धकांची निवड कशी झाली?
जयपूरमधील ‘झी स्टुडिओज’ (Zee Studios) येथे या स्पर्धेचा भव्य अंतिम सोहळा पार पडला आणि त्यासोबतच अनेक महिने चाललेल्या ऑडिशन्स, ग्रूमिंग सत्रे व प्राथमिक स्पर्धांची सांगता झाली. आयोजकांनी दिलेल्या माहितीनूसार, २०२६ च्या या आवृत्तीसाठी निवड प्रक्रियेदरम्यान सुमारे ८,००० ते ९,००० इच्छुक स्पर्धकांचा विचार करण्यात आला. प्रादेशिक स्तरावरील स्पर्धा, अंतिम ऑडिशन्स, वाइल्डकार्ड एन्ट्रीज आणि अनिवासी भारतीय (NRI) श्रेणी यांद्वारे अंतिम ५२ स्पर्धकांची निवड करण्यात आली.