मुंबई : राज्यात काही ठिकाणी खरीप पिकांवर व विशेष करून सोयाबीन व कपाशीवर बोंडअळी (Bollworm) व अन्य किडींचा प्रादुर्भाव असल्याचे उघड झाले. याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नेतृत्वात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत तातडीने विभागाची बैठक घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी तयार केलेले सोलार लाईट ट्रॅप बाधित शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. हे लाईट ट्रॅप बोंड आळीचे व अन्य किडींचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरले आहेत.
तसेच फेरामाईन ट्रॅप व कृषी विद्यापीठाने सुचवलेल्या वेगवेगळ्या फवारण्या आदी बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे निर्देश दिले. याबाबत आयुक्तस्तरावरून व कृषी विद्यापीठाचे तज्ञांचे यांची एक संयुक्त पथक करून दैनंदिन आढावा घेण्याचे तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, त्याचबरोबर चारही कृषी विद्यापीठातील या विषयाचे तज्ञ यांसह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.
- Acharya Chanakya Skill Development Centre: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
- Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित
- Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
- Rahul Gandhi: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल
- Bacchu Kadu: तिसऱ्या आघाडीला एआयएमआयएम नको – बच्चू कडू