Saturday, September 21, 2024

तंत्रज्ञानातील प्रगती लोकशाहीला आणखी सशक्त करणार; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

Share

नागपूर : भारताला एकेकाळी स्लिपिंग जायंट म्हणून ओळखले जायचे. ती ओळख आता आपण पूर्णतः पुसून काढली असून तंत्रकौशल्यात एक मैलाचा टप्पा आपण गाठला आहे. शिक्षणापासून ते डिजीटल तंत्रज्ञानापर्यंत आपण साध्य केलेली प्रगती ही लोकशाहीच्या भवितव्याला अधिक उज्वल करणारी असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) यांनी रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित विशेष समारंभात उपराष्ट्रपती बोलत होते.

यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, चान्सलर डॉ. एस. एस. मंथा, कुलगुरू डॉ. आर. एस. पांडे, सचिव राजेंद्र पुरोहित व मान्यवर उपस्थित होते.

जागतिक लोकशाही दिन आपण साजरा करीत आहोत याचा धागा पकडून त्यांनी लोकशाहीच्या सशक्तीकरणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण ही सेवा आहे. सामाजिक उत्तरदायित्वाचे यात भान आहे. शिक्षणाच्या व्यवसायापेक्षा नैतिकतेला, आदर्श विद्यार्थी घडवायला रामदेवबाबा शिक्षण संस्थेने आजवर दिलेल्या योगदानाचा उपराष्ट्रपतींनी गौरव केला.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व उपराष्ट्रपती धनखड यांनी विषद केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण होत असतात. हीच आव्हाने संधीत रुपांतरित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ग्रीन हायड्रोजन यासारखे तंत्रज्ञान हे गेम चेंजर ठरणार असल्याचे ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख