Friday, October 25, 2024

उद्धवजी, किती दिवस जनतेची दिशाभूल करणार? तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा

Share

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) यांनी बदलापूर येथील घटनेवरून उद्धव ठाकरेंना यांना चांगलंच सुनावलं आहे. गंभीर आरोप केले आहेत. “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट” अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकाता, हाथरस, उन्नाव या बाहेरील राज्यातील घटनांवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मोठमोठ्या गप्पा मारतात, परंतु त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील महाराष्ट्रातील गंभीर घटनांवर ते शांत राहतात, असा टीका बावनकुळे यांनी ट्विट करून लगावला.

त्यांनी आपल्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट जश्याच तसं…

“उद्धवजी कशाला दिशाभूल करता?

  • तुम्ही मुख्यमंत्री होते तेंव्हा हिंगणघाट, भोपर, साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. घडले!

“आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट,” अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकत्ता, हाथरस, उनाव येथील घटनांवर तुम्ही बोलता.
पण आश्चर्य आहे, तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसून नैतिकतेच्या गप्पा करता, बदलापूरच्या घटनेआडून राजकारण करता त्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात कित्ती भयंकर घडले होते. तेही कारनामे जरा आठवा. जनतेला ऐकवा.
तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा. जनतेला कळू द्या. आपले झाकून ठेवून कित्ती दिवस जनतेची दिशाभूल करणार उद्धवजी..!

  • २२ ऑगस्ट २०१३ रोजी, म्हणजे ११ वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी मुंबईतील शक्ती मिलमध्ये प्रेस फोटोग्राफर असलेल्या २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
    तेंव्हा सरकार काँग्रेस -राष्ट्रवादीचे होते.
  • हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळले होते.
    तेव्हा तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते आणि
    वसुली सम्राट गृहमंत्री होते..!
  • डोंबिवलीच्या भोपरमध्ये १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. ३३ आरोपींची नावं समोर आली होती.

तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते..!
मुंबईतील साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. येथील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता.

तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते..!

या सर्वच घटनांचा आम्ही निषेध करतो, आरोपीना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पुढाकार घेतो. पण तुम्ही ‘उठता बसता’ राजकारण करता.
उद्धवजी, हे निषेधार्ह आहे. तुमचा दुतोंडीपणा जनता ओळखून आहे.”

अन्य लेख

संबंधित लेख