Friday, February 13, 2026

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे

Share

या सरकारला गेट आउट म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे. अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा महाराष्ट्र १० वर्ष मागे नेला, अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये. शरद पवारांचे वय ८३ झाले तरी त्यांना मराठा समाजाला न्याय देता आला नाही. शरद पवार प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत. त्यांची प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे. उलट पवारांनी राज्यात शांततेचा संदेश दिला पाहिजे. आम्ही सत्तेत येणार असे ते म्हणत असले तरी अजित पवार त्यांना सत्तेत येऊ देणार नाहीत. वास्तविक मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राजकारण न करता तो पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यावर राजकारण करत आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केला.

अन्य लेख

संबंधित लेख