Thursday, October 24, 2024

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार विरुद्ध आधुनिक पुरोगामी चिंतन

Share

जो पर्यंत तुम्ही भारतीय संस्कृतीला मुळापासून अमान्य करत नाही किंवा अगदी शिवराळ भाषेत तिचा धिक्कार करत नाही तो पर्यंत तुम्हाला जमाते पुरोगामी कडून मान्यता मिळायची शक्यता नाहीच. 

तुकडोजी महाराजांच्या विचारात जी स्पष्टता आहे ती अभूतपूर्व आहे. महाराज पुरोगामी होते पण आजच्या जमाते पुरोगामी सारखे गाफील कधीच नव्हते. स्वतःचा सर्वधर्म समभाव शाबूत करण्यासाठी त्यांनी अकारण हिंदुना शिव्या घातल्या नाहीत.गोरक्षनाचे पुरस्कर्ते, बाल ब्रम्हचारी, गुरुशिष्य परंपरेतील तुकडोजी महाराज आहेत. मंदिरांचे समाजातील स्थान याबद्दल अमाप लेखण त्यांनी करून ठेवले आहे. 

सुखी-समृद्ध करावे गावा | या साठी मंदिर-निधी योजावा |
ही सेवाचि आवडे देवा | आपुलिया जीवांची||

तर असे आमचे तुकडोजी महाराज आत्ताच्या आगाऊ क्रांतिकारकांच्या लेखणीच्या धारेवर येणे स्वाभाविक आहे. विदर्भात महाराजांचे विचार सर्वश्रुत आहेत ते कुठल्या “पाल” परिवाराच्या किर्तनामुळे  नाही तर  ग्रामगीते मुळे आहे  कारण ती वाचताना तुम्हांला शब्दांचे अर्थ शोधण्याची गरज पडत नाही. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही ती सहजतेनं मनावर कोरून घेतो. पण या मुळे खूप लोकांचे धंदे बंद पडायला लागले आहेत. कारण जो महाराजांच्या मार्गाने चालतो त्याला मुर्खात काढणे सोपे नाही त्याच्या पुढे  समाजविघातक विचार रेटू शकत नाही देवा धर्माला सरसकट अपमानित करता येत नाही तो प्रतिप्रश्न विचारतो आणि निर्णय घेत असताना राष्ट्रसंतांकडे रेफरन्स म्हणून बघतो. 

आत्ताच फेसबुक वर एका संकुचित बुद्धीच्या व्यक्तीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ब्राम्हणांचा सरकारी संत म्हणून अपमानास्पद पोस्ट केली. कारण आहे तुकडोजी महाराज हे विश्व हिंदू परिषद चे संस्थापक सदस्य होते.तुकडोजी महाराजांची वर्ण व्यवस्थेच्या विषयीची भूमिका स्पष्ट होती. 

ते धर्मांतराच्या विरोधात होते. सेवेच्या नावाखाली ख्रिस्ती लोकं धर्मांतर करायचे हे त्यांना पटायचे नाही. महाराजांना मंदिरांच्या जिर्णोद्धारा बद्दल आपुलकी असायची, ते गाईच्या महत्वा बद्दल बोलायचे. ग्रामगीतेत अध्याय 25 हा पुर्णतः’ देव-देवळे’ या विषयावर आहे. 26 वा अध्याय मुर्ती उपासनेवर. 

हे हलक्या विचारांचे लोकं महाराजांवर पातळी सोडून टिका करतात आणि आपले लोकं यांना स्पष्टीकरण देत सुटतात. यांना स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही ही तीच लोकं आहेत जे नरेंद्र दाभोळकरांना ब्राम्हणवादी म्हणायला मागेपुढे बघत नाहीत. 

जमाते पुरोगामी आणि महाराजांच्या नावाने पैसा घेऊन प्रबोधनाचे किर्तन करणारे पण तेवढेच दोषी आहेत. यांनी कधीही तुकडोजी महाराजांचे विचार सरसकट मांडले नाहीत सतत एकच बाजू मांडून यांनी महाराजांच्या विचारांचा प्रभाव कमी करायचं काम केलं आहे. 

तुकडोजी महाराजांच्या ‘लहर की बरखा’ या ग्रंथातील एक ओवी आहे. 

करा काही संघटना, हिंदुधर्मासाठी नाना। 
नुरलासे कुणी शुर, वाहे हिंदुधर्म भार। 
पर धर्माचे पारधी, पाहे शिकरीची संधी। 
“तुकड्यादास” म्हणे यारे, देवापाशी शरण जारे।

– तुकडोजी महाराज

महाराजांचे हे विचार जाणून- बुजून कुणी समाजात सांगत नाहीत कारण हे सांगितल्यावर कुणी कार्यक्रमाला बोलवणार नाही. नो कार्यक्रम – नो पैसा. म्हणून फक्त एक अर्धवट ओवी घ्यायची आणि तीच एक तास खंजिरी बडवून बडवून  घासायची. 

महाराजांचे अजून खूप विचार आहेत जे यांना पचनी पडणार नाहीत यथावकाश ते समोर येतीलच त्यावेळी किती ढोंगी लोकं दुर पडतील ते पाहण्यासारखे असेल

तपेश हबंर्डे

अन्य लेख

संबंधित लेख