मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांनी सरकारला याच मुद्द्यावरून घेरलं आहे. पुतळ्याचा दर्जा निकृष्ट होता, अशा प्रकारचा पुतळा सरकारने उभा केलाच कसा काय? असा प्रकारचे प्रश्न विरोधक विचारत आहेत. यावर, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच सुनावलं आहे. ते म्हणाले कि, “यावर राजकारण करणं हा खुजेपणा आहे” अशी टीका त्यांनी केली.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. सगळ्यांनाच वेदना झाल्या आहेत. यावर कोणीही राजकारण करु नये. महाराष्ट्र सरकारने पुतळा उभारला नव्हता तर नौदलाने उभारला होता. ज्यांना हे काम देण्यात आलं त्यांना कदाचित इतक्या वेगाने तिथे वारे वाहतात याचं आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी आम्ही नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, यावर राजकारण करणं हा खुजेपणा आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
- काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार
- नवी मुंबईत साकारणार श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या नावाने अत्याधुनिक रुग्णालय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
- इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणा; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘हिंद दी चादर’ समागमासाठी संदेश
- हिंद-दी-चादर : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली लंगरसेवा; ८ भव्य लंगरमध्ये लाखो भाविकांची घेतला महाप्रसादाचा लाभ
- मानवतेच्या इतिहासातील गौरवशाली पर्व: गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गौरव